![]() |
आज आपण या लेखात, आपण ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचारासाठी माहिती अधिकार (RTI) अर्ज कसा लिहावा याबद्दल चर्चा करू. आणि अर्ज कुठे सादर करायचा आणि त्यावर योग्य ती पाठपुरावा कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती देऊ.
भारतातील ग्रामीण भागातील सर्वात महत्त्वाची स्वयंशासित संस्था म्हणजे ग्रामपंचायत. परंतु दुर्दैवाने, अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींमध्ये गैर व्यवहार, भ्रष्टाचार आणि निधीतून झालेले प्रकरणे उघडकीस येत आहेत. अशा परिस्थितीत, माहिती अधिकार कायदा (RTI कायदा २००५) हे एक शक्तिशाली साधन आहे. या कायद्याच्या मदतीने, आपण ग्रामपंचायतीच्या कामकाजाची आणि निधीची माहिती घेऊ शकतो आणि ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करू शकतो.
ग्रामपंचायतींमध्ये सामान्य प्रकारचे भ्रष्टाचार
ग्रामपंचायतींमध्ये खालील प्रकारचे भ्रष्टाचार सामान्यतः दिसून येतात:
१. निधीचा गैरवापर
- - राज्य सरकारी योजनांसाठी असलेले निधीचे पैसे खिशात घालले जात आहेत
- - बनावट बिले तयार करून हप्त्यांमध्ये पैसे वसुल करून घेणे
२. बेकायदेशीर जमिनीचे व्यवहार करून घेणे.
- - अतिक्रमण व सार्वजनिक जमिनीचा गैरवापर
- - भ्रष्ट मार्गांनी सार्वजनिक जमिनीचे हस्तांतरण
३. नोकरीत फेरफार करून घेणे.
- - घरघरात नातेवाईकांना नोकऱ्या देणे
- - हस्तक्षेप करत भरती प्रक्रियेत अनियमितता
४. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत अडथळा येणे
- - ग्रामपंचायत खेडे पाडे, रस्ते, पाणी योजना, शाळा यांच्या बांधकामात हेराफेरी करणे
५. कागदपत्रांमध्ये फेरफार
- - ठराव प्रस्तावांची अंमलबजावणी न करून परस्पर बदलणे
माहिती अधिकार (आरटीआय) कायद्याची ओळख
- - संविधानिक मार्गाने माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत नागरिकांना सरकारी संस्थांकडून माहिती मागण्याचा अधिकार देतो.
- - भारतातील प्रत्येक ग्रामपंचायतींना माहिती अधिकार कायदा लागू आहे.
- - जर तुम्ही ऑफलाईन अर्ज केला तर १० रुपये शुल्क घेऊन ३० दिवसांच्या आत माहिती मिळवणे बंधनकारक आहे.
ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारासाठी माहिती अधिकार (RTI) अर्ज कसा लिहावा?
१: प्रथम ग्रामपंचायत ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकाऱ्याकडे अर्ज पाठवणे
- - ग्रामपंचायतीचे सरपंच किंवा सचिव हे जन माहिती अधिकारी (पीआयओ) असतात. हेच माहिती देतात.
- - जर सरपंच किंवा सचिव माहिती दिली किंवा यांनी काम केले नाही तर गट विकास अधिकारी (बीडीओ) यांच्या कडे प्रथम अपील करा.
- - प्रथम अर्जाची सुनावणी झाल्यावर माहिती न मिळाल्यास दुसरे अपील खंडपीठ ला करा.
२: माहिती अधिकार RTI अर्जाचा नमुना
ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारासाठी माहिती अधिकार अर्ज हा साध्या कागदावर इंग्रजी, हिंदी किंवा मराठीमध्ये लिहिता येतो. खालील प्रमाणे माहिती द्यावी आणि विनंती देखील करावी. :
- 1. पत्राचे शीर्षक: "माहिती अधिकार (RTI) कायद्यांतर्गत माहिती "
- 2. जन माहिती अधिकारी : त्यांचे नाव आणि पत्ता लिहा.
- 3. अर्जदारचे नाव : ज्यांचे नावाने लिहायचे त्यांच्या नावे लिहा.
- 4. अर्जदारचा पत्ता: संपूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक
- 5. माहितीची तपशीलवार माहिती: स्पष्ट आणि संक्षिप्त विषय
- 6. शुल्क: कोर्ट फी १० रुपये चा लावावा (किंवा तुम्ही बीपीएल कार्ड धराक असल्यास शुल्क माफ केले जाते)
३: माहिती अधिकार RTI अर्जाचा नमुना
- जन माहिती अधिकारी
- [असलेल्या ग्रामपंचायतीचे नाव],
- (ता. जिल्हा), महाराष्ट्र.
- अर्जदार : ज्यांचे नावाने लिहायचे त्यांच्या नावे लिहा.
- अर्जदारचा पत्ता: संपूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक
- विषय: ( ग्रामपंचायत चे नाव लिहा) या ग्रामपंचायत मधील विकास कामाची माहिती मिळणे बाबत.
मी, [ ज्यांचे नावाने लिहायचे त्यांच्या नाव लिहा ], [गावाचे नाव लिहा] येथील कायमस्वरूपी रहिवासी आहे. माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत मला ग्रामपंचायत मधील विकास कामाची माहिती मिळावे.
- १. मागील सन 2023 ते चालू तीन वर्षात ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या सर्व विकास कामाची यादी ची नकल प्रत माहिती अधिकार च्या शिक्का सह मिळावे.
- २. मागील सन 2023 ते चालू तीन वर्षात विकास कामावर खर्च केलेल्या रकमेचा तपशील माहिती अधिकार च्या शिक्का सह मिळावे.
- ३. मागील सन 2023 ते चालू तीन वर्षात ग्रामपंचायत मधील कामाच्या अंमलबजावणीसाठी मंजूर केलेल्या ठरावांच्या नकल प्रत माहिती अधिकार च्या शिक्का सह मिळावे.
- ४. मागील सन 2023 ते चालू तीन वर्षात ग्रामपंचायतीने जमा आणि खर्च केलेल्या निधी चा नोंद केलेल्या रजिस्टर च्या नकल प्रती माहिती अधिकार च्या शिक्का सह मिळावे.
सदर वरील माहिती ३० दिवसांच्या आत द्यावी.
धन्यवाद,
- [अर्जदार यांचे नाव लिहा.]
- [संपूर्ण पत्ता लिहा]
- [दोन मोबाइल नंबर लिहा. असल्यास]
- [अर्ज केल्याची तारीख लिहा]
४: माहिती अधिकराचा अर्ज सादर करणे आणि नियमित पाठपुरावा करणे.
- - अर्ज हा स्वतः पोस्टाने, वैयक्तिकरित्या किंवा ईमेलद्वारे सादर करा.
- - पोच पावती मिळवा (अर्जावर तारीख आणि Received शिक्का सह स्वाक्षरी मागवा).
- - जर आपणास ३० दिवसांच्या आत माहिती मिळाली नाही, तर प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांकडे माहिती अधिकार अर्ज द्वारे प्रथम अपील दाखल करा.
- - प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांकडून देखील पुन्हा माहिती मिळाली नाही तर. दुसरे आणि शेवटचे अपील करा.
५: जर का माहिती मिळाली तर पढे काय करावे ते खालीलप्रमाणे वाचा.
- १. केलेल्या कामाची चौकशी करा - जर कामात किंवा इतर कागदोपत्री मध्ये काही तफावत आढळली तर उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार करा.
- २. निशुल्क असलेल्या समाज माध्यमांना माहिती द्या - जिल्ह्यातील, तालुक्यातील स्थानिक वृत्तपत्रांना माहिती द्या.
- ३. लोकपाल किंवा एसीबीकडे तक्रार करा - ग्रामपंचायत चा गंभीर भ्रष्टाचार असल्यास, ते चौकशी करतील आणि स्थानिक पोलिस कारवाई करू शकतात.
निष्कर्ष
माहिती अधिकार कायदा हे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरुद्ध सर्वात मोठे शस्त्र आहे. गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या अनियमितता,गैर व्यवहार, भ्रष्टाचार, उघड करण्यासाठी या कायद्याचा वापर करावा. एक अर्ज संपूर्ण गावाचे नशीब बदलू शकतो!
अशा अधिक महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या सोशिअल मीडिया ला भेट द्या! ( How to write a Right to Information application for corruption in Gram Panchayat?